सेलू ,
“सेठ हीराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट, पुणे” या धार्मिक व सामाजिक मालमत्तेशी संबंधित विषयात पारदर्शकता, ट्रस्ट डीडमधील तरतुदींचे पालन आणि प्रशासकीय कार्यवाहीत निष्पक्षता राखावी, या मागणीसाठी आज सेलू येथील जैन समाजाच्या वतीने शांततेत मोर्चा काढण्यात आला.सकाळी १०.३० वाजता श्री जैन मंदिर येथे समाजबांधव मोठ्या संख्येने जमले. समाजाच्या ऐक्याचे दर्शन घडवत सर्वजण शांततेच्या मार्गाने उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. सकाळी ११ वाजता उपजिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून निवेदन सादर करण्यात आले.हा मोर्चा पूर्णतः अनुशासित, मौन व शांततेच्या वातावरणात पार पडला. निवेदन श्रीकृष्णा देशमुख (नायब तहसीलदार) यांनी स्वीकारले. निवेदन सादर करणाऱ्यांमध्ये निलेश बिनायके (अध्यक्ष), अशोक काला, रमेश काला, सतीश गंगवाल, जीतेन्द्र गंगवाल, अशोक वानरे, ऋषभ काला, ईश्वर जैन, रोहित काला आदींसह समाजबांधव उपस्थित होते.मोर्चात सहभागी झालेल्यांमध्ये अशोक भंडारी, महावीर आँचलिया, महावीर गंगवाल, नेमिनाथ दुत्ते, सुमीत काला, परेश संगई, रुपाली गंगवाल, भारती काला, रूपा काला, सुनीता काला तसेच इतर अनेक जैन बांधव व भगिनीवर्ग उत्साहाने सहभागी झाले.मोर्चाचे आयोजन आणि यशस्वी पार पाडण्यासाठी निलेश बिनायके, ऋषभ काला, आशिष बिनायके, दीपक बिनायके, जितेंद्र गंगवाल, देवेंद्र काला आणि गीताराम कोकणे यांनी विशेष प्रयत्न केले. संपूर्ण कार्यक्रमाची व्यवस्था अत्यंत सुरळीतरीत्या पार पडली.
सेलू जैन समाजाने दाखवलेली एकजूट, अनुशासन आणि शांततेचे पालन हे संपूर्ण समाजासाठी आदर्श ठरले आहे. ट्रस्टच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता यावी, यासाठी हा मोर्चा एक महत्त्वाचे पाऊल ठरावे, अशी अपेक्षा निलेश बिनायके यांनी व्यक्त केली.सेठ हीराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या पुणे येथील मालमत्तेच्या विक्री प्रक्रियेत झालेली अपारदर्शकता आणि समाजाच्या भावनांचा झालेला अवमान हा सर्वथा निंदनीय असल्याचे मत समाजबांधवांनी व्यक्त केले. ट्रस्ट डीडमधील तरतुदींचे काटेकोर पालन होऊन समाजाच्या हिताचे निर्णय व्हावेत, अशी सर्वांची एकमुखी मागणी या शांततामोर्चातून करण्यात आली.